ग. य. धारप - लेख सूची

मी नास्तिक का आहे

या प्रश्नाचे उत्तर ‘मी आस्तिक नाही म्हणून’ या चार शब्दांत देणे शक्य आहे हा विचार बाजूला सारला तरी मी जन्मतःच नास्तिक नव्हतो. कोणतीही व्यक्ती तिला थोडेफार कळायला लागल्यावर तिच्या अवतीभवतीच्या वातावरणानुसार, उदा. घरातील संस्कार, शाळेतील शिक्षण, ती व्यक्ती वावरत असलेल्या समाजाचा सर्वसाधारण विचार, इत्यादि कारणांमुळे आस्तिक किंवा नास्तिक बनत असते. संपादकांनी सुचविलेला विषय फक्त ईश्वराचे …

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,स. न. वि. वि. आजचा सुधारक डिसेंबर ९४ च्या अंकातील माझ्या पत्रावर व प्रत्रातील कवितेवर सर्वेक्षणाचे प्रवर्तक डॉ. र. वि. पंडित व अमरावतीच्या सत्यबाला माहेश्वरी अशा दोघांच्या जानेवारी ९५ च्या अंकात आलेल्या प्रतिक्रियात त्यांनी बरेच आक्षेप घेतले आहेत. तसेच दोघांनीही बरेच असंबद्ध (irrelevant) मुद्दे उपस्थित केले आहेत. उदा. डॉ. पंडित यांनी स्वतःच्या …

नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात कर्मचारी संघटनांकडे दृष्टिक्षेप

नवीन आर्थिक धोरणांच्या संदर्भात भारतीय कर्मचार्‍यांच्या संघटनांचे धोरण विरोधी व स्वार्थी आहे. उदाहरणार्थ भारतातील ५४,००० (यांपैकी केवळ १०० शाखा बंद झाल्या तरी) ५३,९०० राष्ट्रीयीकृत बँक शाखांतील अवाढव्य (बहुधा २० लाख) कर्मचारीवर्ग थोडेसे अपवाद वगळता, रा. स्व. संघ व भा.ज.प. मनोवृत्तीचा आहे व त्यांच्या संघटनाही त्याच मनोवृत्तीच्या असतात. ह्या कर्मचार्‍यांची वृत्ती कशाप्रकारची आहे? रशियात सार्वजनिक क्षेत्रांचे …

चर्चा- डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या लेखाबद्दल

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांचा मार्च ९२ च्या अंकातील ‘मरू घातलेली जात’ हा लेख, एप्रिल ९२ च्या अंकातील श्री. केशवराव जोशी यांचे पत्र वाचल्यावर पुन्हा एकदा वाचला. त्यावरील प्रतिक्रिया. डॉ. वर्‍हाडपांडे यांच्या प्रतिपादनाप्रमाणे मार्क्सवाद संपला आहे. ठीक आहे. मग त्याबद्दल इतका त्रागा करून लेख लिहिण्याची गरज कशासाठी? वस्तुस्थिति अशी आहे की सगळ्या जगालाच मार्क्सवादाचा स्वीकार …

टिपण-हसावे की रडावे?

आजच्या सुधारकच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अंकातील संपादकीयात म्हटले आहे की “आगरकरांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतरही …

विनोबांची ‘गीता प्रवचने’ व ‘स्थितप्रज्ञदर्शन’

‘गीता प्रवचने’ यातील ‘अध्याय पहिला’ या प्रवचनात विनोबा म्हणतात, “तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो.” (गीता प्रवचने, आ. १३, पान १) तर्काला छाटल्यामुळे सत्यशोधन टाळता येते. तर्काला फाटा दिल्यामुळे गीतेतील सर्व प्रतिपादन खरे म्हणून स्वीकारावे लागते, आणि विनोबांनी ते तसे स्वीकारले आहे. गीता प्रवचनांतील अध्याय २ …